टीम सत्ताकारण
मुंबई : गेल्या काही दिवसांपासुन राज्याच्या राजकारणात राजकीय भुकंप झाल्यानंतर सत्तांतर होणार असल्याची जोरदार चर्चा रंगत आहे. दरम्यान, विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी राज्यपाल भगतसिंग कौश्यारी यांना बहुमत सिद्ध करण्याबाबत पञ दिल्याने सत्तांतर होण्याच्या दिशेनी वारे वाहत असल्याची चिन्हे दिसु लागत असतानाच बुधवारी सकाळी गुवाहाटीमध्ये मुक्कामी असलेले शिंदेगटातील आमदार मुंबईच्या दिशेनी निघणार असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे सत्तांतर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
विधानसभा निवडणुका शिवसेना व भारतीय जनता पक्षाने एकञ लढल्या होत्या. जनतेनी या दोघांच्या बाजुने कलही दिला होता. माञ, मुख्यमंञीपदावरुन दोघांमध्ये बिनसल्याने शिवसेनेनी कांग्रेस व राष्टवादी कांग्रेस यांच्यासोबत एकञ येत तिघांनी मिळुन महाविकास आघाडी सरकार स्थापन केले. वर्षभर सुरळीत कारभार चालल्यानंतर अंतर्गत वाद उफाळुन यायला सुरवात झाली. हळुहळु करीत मागील आठवड्यात शिवसेनेचे गटनेते एकनाथ शिंदे यांनी बंड करीत ३५ हुन अधिक आमदारांना सोबत घेत सुरवातीला सुरत नंतर गुवाहटीला मुक्काम ठोकला. आम्ही सर्वजण सेनेतच असुन उद्धव ठाकरे यांनी भाजपसोबत सरकार स्थापन करावे, अशी मागणी करीत त्यावर ठाम राहीले आहेत.
यावरुन या बंडखोर आमदारांना शिवसेना नेत्यांनी गद्दार असे शब्द वापरत खालच्या दर्जाचीही भाषा वापरली. त्यामुळे वाद मिटण्याऐवजी तो अधिकच वाढला आहे. त्यातच पडद्यामागे असलेले भाजपाच्या नेत्यांनी दिल्ली गाठत शिंदेगटाला सोबत घेत राज्यात नवे सरकार स्थापण करण्याची तयारी सुरु केली. श्री. फडणवीस यांनी मंगळवारी राज्यपालांना पञ देत बहुमत सिद्ध करण्याबाबत मागणी केली. यामुळे अनेक गोष्टी स्पष्ट होत असुन गुवाहाटी मुक्कामी असलेल्या शिंदेगटाने मुंबईत येण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. यामुळे आता महाविकास आघाडी सरकार कोसळण्यात सुरवात झाल्याची चर्चा रंगायला सुरवात झाली आहे.






